Tuesday, January 31, 2023

स्वातंत्र्याची चळवळ

 

 

7. स्वातंत्र्याची चळवळ

 

1  रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

1.  राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना -------- या साली झाली.

2. आर्थिक निःसारणाचा सिद्धांत --------यांनी मांडला. 

3. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” अशी घोषणा ------- नी केली.

४. अली बंधूनी ...........  ही चळवळ सुरू केली.

५. ........... यांनी मुस्लिमांसाठी वेगळ्या राष्ट्राच्या प्रस्ताव मांडला.

६. १९२९ मध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्षपद

 ........... यांनी भूषविले.

७. ........... या व्यक्तीने "महाड' आणि काळाराम देऊळ प्रवेशासाठी चळवळ केली.

८. ........... यांनी भारतीय राष्ट्रीय सैन्याच्या झाशी या रेजिमेंटचे नेतृत्व केले होते.

९. ........... या ठिकाणी गांधीजीनी मिठाचा सत्याग्रह केला.

१०. ........... या साली चले जाव (भारत छोडो) चळवळ झाली.

उत्तरे : 1. इ.स. 1885 2. दादाभाई नौरोजी 3. बाळ गंगाधर टिळक  4. खिलाफत  5. मोहम्मद अली जिना 6. पंडित. जवाहरलाल नेहरू 7. बाबासाहेब आंबेडकर 8. कॅप्टन लक्ष्मी सेहगल 9. दांडी 10. 1942

 

2. खालील पैकी योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा.

1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक

 अ) महात्मा गांधी    ब) ए.ओ. ह्यूम  क) बाळ गंगाधर टिळक  ड) गोपाळ कृष्ण गोखले

2. ‘मराठा’ या  वृत्तपत्राचे प्रकाशक ------------- हे होते.

 अ) जवाहरलाल नेहरू  ब) रासबिहारी बोस  क) बाळ गंगाधर टिळक  ड) व्ही. डी. सावरकर

3. स्वराज पार्टीची स्थापना-----------------  या साली झाली.

 अ) 1924   ब) 1923  क) 1929   ड) 1906 

4. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या हरिपुर मधील सभेचे अध्यक्ष  ...........  हे होते.

अ) सरदार वल्लभभाई पटेल ब) डॉ. बी. आर. आंबेडकर क) लाल लजपत राय ड) सुभाषचंद्र बोस

 

5. भारताचे पोलादी पुरुष ........... हे होते.

अ) भगत सिंग ब) चंद्रशेखर आझाद  क) अबुल कलाम आझाद ड) सरदार वल्लभभाई पटेल

उत्तरे : 1. ब) ए.ओ. ह्यूम   2. क) बाळ गंगाधर टिळक  3. ब) 1923  4. ड) सुभाषचंद्र बोस 5. ड) सरदार वल्लभभाई पटेल

3.खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या  स्थापनेपूर्वी भारतात कोणत्या संघटना अस्तित्वात होत्या?

उत्तर : द हिंदू मेळा, द ईस्ट इंडियन असोसिएशन, पुणे सार्वजनिक सभा व द इंडियन असोसिएशन इ. संघटना होत्या.

 

2. मवाळांनी ब्रिटीशांसमोर कोणकोणत्या मागण्या मांडल्या?

उत्तर : उद्योगधंद्यांची वाढ करणे, संरक्षण खात्यावरील खर्च कमी करणे,  शैक्षणिक क्षेत्रात विकास साधणे अशा अनेक मागण्या  सरकारपुढे मांडून देशातील दारिद्र्यरेषेचा अंदाज घेण्यास त्यांना भाग पाडले.

प्रथमच मवाळांनी भारतातील ब्रिटीशांच्या गैरराज्यकारभाराविषयी विश्लेषण केले. भारतातील संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे चाललेला आहे ही आकडेवारी आणि वस्तुस्थिती लोकांच्यासमोर मांडली.


3. आर्थिक निःसारणाच्या  सिद्धांताचे विश्लेषण करा. 

उत्तर :दादाभाई नौरोजींनी भारतीय संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे चालला आहे हे  सांगितले. यालाच आर्थिक ‘निःसारणाचा सिद्धांत’  म्हणतात. निर्यात कमी  होऊन आयात वाढल्यामुळे प्रतिकूल रक्कमेच्या शिल्लकीत वाढ झाली आणि भारतातील संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे जाऊ लागला. हे त्यांनी स्पष्ट केले. भारताच्या खजिन्यातून दिला जाणारा पगार, निवृत्ती वेतन, ब्रिटीश अधिकाèयांचे शासकीय खर्च या मार्गाने भरपूर संपत्तीचा प्रवाह इंग्लंडला गेला.  

 

4. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख क्रांतीकारकांची नावे लिहा.

 उत्तर : विनायक दामोदर सावरकर, अरविंद घोष, अश्विनी कुमार दत्त, राजनारायण बोस, राजगुरु, चाफेकर बंधू, शामाजी कृष्णवर्मा, रासबिहारी बोस, मादाम कामा, खुदिराम बोस, रामप्रसाद बिस्मिल, अशपाक उल्लाखान, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, जतीनदास हे प्रमुख क्रांतीकारक होते.


5. स्वातंत्र्य चळवळी मध्ये बाळ गंगाधर टिळक यांचे योगदान कोणते? 

उत्तर : 1) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे काँग्रेसमधील जहालमतवादी नेते होते. 2) अर्ज व विनंत्या करून ब्रिटिश सरकार भारताला स्वातंत्र्य देणार नाही या गोष्टीवर टिळकांचा विश्वास होता. 3) स्वातंत्र्याच्याऐवजी उत्तम प्रशासन हा पर्याय होऊच शकत नाही याचे समर्थन टिळकांनी केले.  4)  स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, अशी सिंहगर्जना करून टिळकांनी स्वतंत्र भारत हे लक्ष्य ठेवले. 5) सामान्य लोकांना स्वातंत्र्य चळवळीसाठी तयार करून सार्वजनिक शिवजयंती व गणेशोत्सवातून लोकांना एकतेची व राष्ट्रीयत्वाची प्रेरणा निर्माण केली.  6) तुरूंगातील वेळेचा सदुपयोग करून टिळकांनी ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहून स्वातंत्र्य चळवळीस आक्रमक रूप दिले. 7)  टिळकांनी मराठी भाषेत ‘केसरी’ व इंग्रजीत ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू करून ब्रिटीशांविरुद्ध चळवळीचे अस्त्र म्हणून त्यांचा वापर केला.  8) सर्वसामान्य माणसांना ब्रिटीशांविरुद्ध लढा देण्यास प्रेरित केले. 9) स्वराज्य, स्वदेशी, विदेशी मालावर बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतु:सूत्रीचा वापर टिळकांनी प्रभावीपणे केला.10) लाल-बाल-पाल म्हणजेच लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक व बिपीनचंद्र पाल यांनी बंगालच्या फाळणीला कडाडून विरोध केला. 11) लोकांच्यात राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करण्यासाठी आणि त्यांचा सहभाग  वाढविण्यासाठी प्रयत्न केला.


6. बंगालची फाळणी रद्द होण्याची कारणे कोणती?

उत्तर : ब्रिटीशांचे ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणानुसार बंगालची फाळणी झाली. त्याला भारतीय राष्ट्रीय कांगे्रेसने विरोध केला. परंतु बंगालीभाषेच्या मुस्लीम व हिंदू समुदायांना एकत्र आणण्याचे काम भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसने केले. हिंदू व मुस्लीम समुदायात एकात्मता निर्माण करण्यासाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आखण्यात आला होता. बंगालच्या फाळणी विरुद्ध संपूर्ण देशभरात जोरदार विरोध झाला. यामध्ये स्वदेशी चळवळ ही अत्यंत महत्त्वाची होती. जहाल मतवांद्यांनी ही चळवळ सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले स्वदेशी चळवळीने विदेशी वस्तू व त्याची आयात करणाऱ्या संघटनांवर बहिष्कार घातला. स्वदेशी वस्तू वापराव्यात यासाठी भारतीयांना प्रेरित केले. या स्फोटक परिस्थितीमुळे 1911 मध्ये ब्रिटीश सरकाने बंगालची फाळणी रद्द केली.


7 मवाळमतवादी नेत्यांची नावे लिहा.. 

उत्तर : :   मवाळ नेत्यांमध्ये म.गो. रानडे, व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादाभाई नौरोजी आणि गोपाळकृष्ण गोखले हे प्रमुख होते


8. जहालमतवादी नेत्यांची नावे लिहा.

उत्तर :  अरविंदो घोष, लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल आणि बाळ गंगाधर टिळक हे जहाल नेते होत.


9. चौरीचौराच्या घटनांचे वर्णन करा.

उत्तर : 1. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्हयातील ‘चौरीचौरा’ या ठिकाणी 5 फेब्रुवारी 1922 रोजी  ही घटना घडली. 2. 3000 शेतकèयांचा एक मोठा गट पोलीस स्टेशन समोर जमला. 3. दारूच्या दुकानासमोर निदर्शने करणाèया भारतीयांवर लाठीमार करणाèया ब्रिटीश पोलीसांविरुद्ध निषेध व्यक्त करण्यासाठी हे शेतकरी जमले होते. 4. ब्रिटीश पोलीसांनी जमलेल्या शेतकèयांवर गोळीबार सुरु केला. 5. शेतकरी संतप्त झाले व त्यांनी पोलीस स्टेशनला आग लावली. 6. पोलीस स्टेशनमध्ये असणारे 22 अधिकारी जिवंत जाळले गेले 

10.  मिठाच्या सत्याग्रहाचे वर्णन करा.

उत्तर : 1. 1930 मध्ये साबरमती येथील काँग्रेस कार्यकारिणीची सभेनंतर कायदेभंग चळवळ करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2. गांधींनी 2 मार्च 1930 रोजी 11 मागण्या असलेले पत्र व्हॉईसरॉय आयर्विन यांना लिहिले. 3. ब्रिटीश सरकारने जर या मागण्या मान्य केल्या नाहीत तर नागरी कायदेभंग चळवळ, साराबंदीची चळवळ सुरू करण्यात येईल असे घोषित केले. 4.या मागण्या मान्य न झाल्यामुळे 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी आपल्या अनुयायांबरोबर साबरमती आश्रमापासून गुजराथ मधील दांडी पर्यंत पदयात्रा काढली. 5. 6 एप्रिल रोजी गांधी दांडी येथे पोहोचले व मिठाचे उत्पादन करून मिठाचा कायदा मोडला. 6. मिठाच्या सत्यागहानंतर 6 एप्रिल ते 13 एप्रिल पर्यंत राष्ट्रीय आंदोलनाचा सप्ताह साजरा करण्यात आला. 7. या चळवळीत सामील झालेल्या नेत्यांना व हजारो लोकांना अटक करण्यात आली. देशाच्या अनेक भागात ही चळवळ पसरली.

11. स्वातंत्र्य चळवळीत सुभाषचंद्र बोस यांनी कोणते योगदान दिले?

उत्तर :  1. भारतातील क‘ांतीकारकांच्यामधे सुभाषचंद्राचे स्थान अत्यंत महत्त्वाचे. 2. इंग्रजांची उच्चपदस्थ नोकरी नाकारून स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभाग घेतला.3. ते नेताजी या नावाने प्रसिद्ध होते. 4. परदेशी स्थायिक झालेल्या भारतीयांना इंग्रजाविरूद्ध लढण्यास सज्ज केले. 5. पं. नेहरू व सुभाषचंद्रांनी 1934 ला ‘काँग्रेस समाजवादी पक्षाची’ स्थापना केली. 6. नेताजीनी ‘फॉरवर्ड ब्लॉक’ नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. 8. जर्मनीला जाऊन भारताच्या स्वातंत्र्याकरिता जर्मनीचा हुकूमशहा हिटलरचा पाठिंबा मिळवला. 9. आझाद हिंद रेडिओद्वारे भारतीयांसाठी भाषणे केली.  10.‘इंडियन नॅशनल आर्मीचे नेतृत्व केले. 11. ‘दिल्ली चलो’ ची घोषणा केली. 12. ‘तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन’ अशा शब्दात भारतीयांना विनंती केली. 13. महिलांसाठी ‘झांशी रेजिमेंट’ स्थापन केली. 14. रंगून येथून सुभाषजींनी मिलिटरी युद्धकौशल्य वापरून इंग‘जांच्या ताब्यातील दिल्ली हस्तगत करण्याची योजना आखली. 15. बर्मा सीमेवर इंग्रज सैन्यावर सशस्त्र हल्ला केला.

12. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य स्पष्ट करा.

उत्तर : 1. सामाजिक स्वातंत्र्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याला अर्थ नाही, असे स्पष्ट मत. 2. जातीभेदाचा अभ्यास करून निर्मूलन करण्याची योजना आखली. 3. अस्पृश्यांसाठी महाड आणि काळाराम मंदिर चळवळ सुरू केली. 4. तीनही गोलमेज परिषदेला उपस्थित राहून सल्ले दिले. 5. दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली. 5. काँगे्रस पक्षात सामील न होता ‘बहिष्कृत हितकर्णी सभा’ आणि ‘स्वतंत्र कार्मिक पार्टी’ रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया’ या पक्षांची स्थापना केली. 6. ‘प्रबुद्ध भारत’, ‘जनता’, ‘मूकनायक’ आणि ‘बहिष्कृत भारत’ अशी अनेक वृत्तपत्रे प्रसारित केली. 7. शेतमजुरांच्या प्रगतीसाठी काम केले.  8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष  झाले. 9. अस्पृश्यते विरूद्ध कायदेशीर संरक्षण मिळविले. 10.  स्वातंत्र्यानंतर ते भारताचे कायदा मंत्री झाले. 11.  जातीयतेचा उबग आल्याने हिंदू धर्माशी फारकत  घेऊन बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

13. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आदिवासीच्या बंडाचे वर्णन  करा.
उत्तर : 1. ईस्ट इंडिया कंपनीने कर आणि जंगल कायदा अंमलात आणल्याने आदिवासी चळवळीला सुरुवात झाली. 2.  आदिवासीनी धार्मिक कारणासाठी लढा दिला. 3. आदिवासी बंडखोरात ‘संथालांचे बंड’ आणि ‘मुंदा चळवळ’ या प्रमुख आहेत. 4. या संदर्भात कर्नाटकातील ‘हलगलीच्या बेरडांचे बंड’ झाले. 5. ब्रिटिशांच्या जमीनदारी पद्धतीमुळे आदिवासी लोक निराश्रित झाले. 6. जमीनदार, सावकार आणि इंग्रज सरकारच्या वाईट वागण्यामुळे संथालाच्यामधे असहिष्णू वृत्ती बळावली. 7. कंपनीने सभ्य आणि शांतताप्रिय लोकांचे शोषण केले म्हणून संतप्त संथालानी गुप्त सभा घेतल्या. 8. संथालानी जमीनदार व प्रमुख नागरिकांची लूट केली. 8. सरकारने बंड दडपून टाकण्यासाठी सैन्याचा वापर करून बंडखोराना अटक केली. संथालाचे आंदोलन संपले. पण पुढील चळवळीना त्यांची प्रेरणा मिळाली.

14. असहकार चळवळीच्या कार्यक्रमांची यादी करा.
उत्तर :  1. शाळा, महाविद्यालये व न्यायालयांवर बहिष्कार टाकणे. 2. 1919 च्या कायद्यानुसार घेण्यात येणाऱ्या  प्रांतीय कायदे मंडळाच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकणे. 3. ब्रिटीश सरकारने बहाल केलेल्या पदव्या, सन्मान परत करणे. 4. स्थानिक स्वराज्य संस्थांध्ये नामांकन झालेल्या सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देणे.  5. सरकारी कार्यक्रमात सहभागी न होता बहिष्कार टाकणे. 6. विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकणे. 7. हातमागावरील विणकऱ्यांना प्रोत्साहन देणे 8. खादीचे कापड तयार करणे 9. राष्ट्रीय शाळांची स्थापना करणे 10. हिंदू व मुस्लीम यांच्यांत ऐक्य साधणे. 11.अस्पृश्यता निवारण करणे 12. महिलांना सक्षम बनविणे.

15. चले जाव चळवळीचे वर्णन करा.

उत्तर : 1. महात्मा गांधीनी 1942 मध्ये छोडो भारत चळवळ सुरू केली. 2. आपल्या युद्ध प्रयत्नांना भारतीयांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ब्रिटिश सरकारने ‘क्रिप्स मिशन’ भारतात पाठविले. 3. यानुसार भारताला वसाहतीचा दर्जा देणे व मंत्रिमंडळाची स्थापना करणे असे प्रस्ताव मांडले. म्हणून काँग्रेसने ‘चलेजाव चळवळ’ सुरू केली. 4. म. गांधीजीनी ‘करा अथवा मरा’ हा संदेश दिला  5. या संदर्भात गांधीजी, वल्लभभाई पटेल, नेहरू, राजेंद्र प्रसाद, अबुल कलाम आझाद, कस्तुरबा गांधी इ. नेत्यांना अटक झाली. 6. त्यामुळे नवीन नेत्याची तात्काळ गरज असल्याने जयप्रकाश नारायण नेतेपदी आले.   7.  मुस्लिम लीग या चळवळीत सामील झाली नाही. 

16. पंतप्रधान झाल्यावर नेहरूंनी कोणती भरीव कामगिरी केली?

उत्तर : 1. पंतप्रधान नेहरू हे उद्योगशीलता आणि आधुनिक  भारताचे शिल्पकार होते. 2. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. 3. भांडवलशाही आणि समाजवाद या तत्त्वावर आधारलेली ‘मिश्र आर्थिक योजना’ आधुनिक भारताला दिली 4. शीघ‘ औद्योगिकीकरणामुळे विकास शक्य आहे असे त्यांचे मत होते. 5. भारताला पंचवार्षिक योजनेद्वारे विकासांच्या मार्गावर नेण्यात ते अग्रेसर होते. 6. शीतयुद्धापासून लांब राहून अलिप्ततावाद धोरण स्वीकारले. 7. शांती व सुसंवाद या धोरणांचा सतत पाठपुरावा केला. 8. भारतीय लोकशाहीचा पाया भाषावर प्रांतरचनेने मजबूत केला.  

17. . भारत छोडो (चले जाव) आंदोलनाच्या अपयशाची कारणे कोणती?

उत्तर : चळवळीच्या वेळी  गांधिजी, नेहरू, राजेंद्र प्रसाद, अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभाई पटेल, आचार्य  कृपलानी, कस्तूरबा गांधी आणि अनेक नेत्याना अटक झाली.  कॉँग्रेसचे बरेचसे नेते तुरूंगात गेल्यामूळे कॉँग्रेस व्यतिरिक्त इतर संघटना प्रसिद्धिला आल्या. या परिस्थितीमूळे नवीन नेत्याची तत्काळ गरज निर्माण झाली. याचवेळी जयप्रकाश नारायण नेतेपदी आले. 


18 . दुसऱ्या गोलमेज परिषदेचे परिणाम कोणते?

उत्तर : दुसऱ्या गोलमेज परिषदेत कांहीही निष्पन्न झाले नाही. पण इंग्रजानी अस्पृशांना वेगळा मतदारसंघ देण्याची कबूली दिली. गांधीजीनी आमरण उपोषण चालू केले. आंबेडकराना समजावण्याचे प्रयत्न झाले. दरम्यानच्या काळात "पुणे करार' झाला. या करारानुसार परिशिष्ट  वर्गासाठी विभक्त मतदार संघ रद्द करण्यात आले. या वर्गासाठी राखीव जागा वाढविण्यात आल्या. अशा जागी दलित नेत्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे अस्पृशांचा वेगळा संघ होण्याची शक्यता वाढली. पण राजकीय विभाजन टाळण्यात आले.   

 

 

No comments:

Post a Comment

RanCho ki Guarantee Social Science   https://drive.google.com/file/d/1q2l65k0Ah-qwZYeDH1SJY-QWvlzb_AFj/view?usp=drive_link RanCho ki Guaran...