Tuesday, January 31, 2023

भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध ( इ.स. 1857 )

 

 

6. भारताचे पहिले  स्वातंत्र्य युद्ध ( इ.स. 1857)

 

 

प्रश्न 1. खालील गाळलेल्या जागा योग्य पदांनी भरा. 

1) युरोपियन  इतिहासकारांनी 1857 च्या स्वातंत्र्य युद्धाला ---------- असे म्हटले आहे.

 

2) लॉर्ड डलहौसीनी --------------- हे धोरण अमलात आणले. 

 

3) 1857 च्या बंडात ----------- ने ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार मारले ?

 

4 ) झाशीच्या राणीने इंग्रजां विरुद्धच्या युद्धात ------------- हे ताब्यात घेतले

 

उत्तरे : 1. शिपायांचे बंड 2. दत्तक वारसा नामंजूर / खालसा धोरण / डॉक्टरिन ऑफ लॅप्स 3. मंगल पांडे 4. ग्वाल्हेर 5.   

 

 प्रश्न 1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा

1) दत्तक वारसां नामंजूर या तत्त्वाचे परिणाम काय झाले विश्लेषण करा. 

उत्तर : इंग्रजांनी आपला राज्य विस्तार वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला

      त्यातीलच एक ' दत्तक वारसा नामजूर पद्धत '

      या पद्धतीमुळे बरेचसे प्रांत व राज्य इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आली

      त्यामुळे भारतीय लोक नाराज झाले

      इंग्रजांच्या या शासन पद्धतीमुळे असंतोष माजला

      यामुळेच 1857 चे बंडही झाले

      यालाच खालसा धोरण ' आणि डॉक्टरिन ऑफ लॅप्स ' म्हणतात

 

 2) या काळातील आर्थिक बदल 1857 च्या बंडाला कसे कारणीभूत  ठरले ?

उत्तर : इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे भारतीय कुटीर उद्योगांचा नाश झाला

      भारतीय कारागीरबेकार झाले

      भारतीय सुती वस्त्रे व लोकरी वस्तूंची पिछेहाट झाली

      सुती वस्रोद्योगाचा -हास झाला

      लाखो विणकर आणि कारागीर बेकार झाले

      सुती वस्त्रांवर इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात करलादला गेला

      इंग्रजांनी व जमीनदारांनी शेतकऱ्यांची पिळवणूक केली.

 

3) 1857 च्या युद्धात शिपायांच्या धार्मिक भावना  कशा दुखविल्या गेल्या ?

उत्तर :   भारतीय शिपायांना समुद्र ओलांडून जाण्याची केलेली सक्ती ही आपणास जातीभ्रष्ट करण्याचा प्रयत्न आहे अशी सैनिकांची भावना झाली.

इंग्रज सरकारने नवीन लांब पल्ल्याच्या रॉयल इनफिल्ड बंदुका ' वापरण्यास सुरुवात केली. या बंदुकीसाठी वापरण्यात येणारी काडतुसे होती. त्यांच्या आवरणावर गायीची आणि डुकराची चरबी लावली आहे अशी अफवा पसरली

 

4) पहिल्या स्वातंत्र्य युद्धाला कारणीभूत असलेली  तत्कालीन कारणे  कोणती ?

उत्तर :  इंग्रज सरकारने नवीन लांब पल्ल्याच्या रॉयल इनफिल्ड बंदुका ' वापरण्यास सुरुवात केली

      या बंदुकीसाठी वापरण्यात येणारी काडतुसे होती

      त्यांच्या आवरणावर गायीची आणि डुकराची चरबी लावली आहे अशी अफवा पसरली

      हिंदूंना गायीची चरबी व मुस्लिमांना डुकराची चरबी ही धार्मिक बाब होती

      इंग्रज अधिकाऱ्यांनी ज्यावेळी बंदूक चालविण्याची जबरदस्ती केली त्यावेळी मंगल पांडे या शिपायाने अधिकाऱ्याला गोळी घालून ठार मारले

      हेच या बंडावे तात्कालीन कारण होते.

 

5) 1857 च्या बंडाच्या अपयशाच्या कारणांची यादी करा.

उत्तर  : ही स्वातंत्र्य संग्रामाची चळवळ संपूर्ण भारतात पसरली नाही

      ही चळवळ काही ठराविक लोकांच्या हितापुरती मर्यादित राहिली

      इंग्रजी सैन्यांमधील एकी व भारतीय सैन्यातील असंघटितपणा अपयशाला कारणीभूत ठरला.

      बंडखोरांना योग्य नेतृत्व लाभले नाही

      अयोग्य नीती, अकुशलता, बेशिस्तपणात दिशाहीनता ही कारणे असफलते मागे होती.

      बंडखोरांनी लूट, दरोडे घातल्यामुळे जनसामान्यांचा विश्वास गमावला

      अनेक संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले

 

6) 1858 मध्ये ब्रिटनच्या  राणीने जाहीर केलेली आश्वासने कोणती ?

उत्तर  : ईस्ट इंडिया कंपनीने स्थानिक संस्थानिकांशी केलेला करार स्वीकारण्यात आला. 

      महत्त्वाकांक्षी विस्तार योजनांना आळा बसला

      भारतीयांना स्थिर सरकार देण्याचे आश्वासन दिले

      कायद्यांमध्ये समानता ठेवली गेली

      धार्मिक सहिष्णुता असेल तसेच भारतीयांच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप केला जाणार नाही  

 

 

No comments:

Post a Comment

RanCho ki Guarantee Social Science   https://drive.google.com/file/d/1q2l65k0Ah-qwZYeDH1SJY-QWvlzb_AFj/view?usp=drive_link RanCho ki Guaran...