भारताचे गव्हर्नर जनरल,
व्हाईसरॉय |
|||
अ. क्र. |
छायाचित्र |
नाव (जन्म मृत्यु) कार्यकाल |
महत्त्वाच्या
घटना |
बंगालचे गव्हर्नर (1756 -1774) |
|||
1 |
|
रॉबर्ट क्लाईव्हजन्म : 1725 मृत्यु : 1774
कार्यकाल : 1757 -1760
व 1765 ते 1767 |
· भारतात इंग्रजी सत्तेचा पाया
रोवला. · प्लासीचे युद्ध :- जून 1757 रोजी
प्लासीच्या मैदानात सिराजउदौला व कंपनीच्या सेनेत युद्ध झाले. या युद्धात लॉर्ड
क्लाईव्हने सिराजउदौलाचा पराभव करून बंगालवर ताबा मिळविला. · बक्सारची लढाई :- बंगालचा नवाब
मीरकासीम, अयोध्येचा नवाब शुजाउदौला व दिल्लीचा बादशहा शहाआलम
यांचा सन 1764 मध्ये बक्सार
येथे कंपनीच्या सेनेने पराभव केला. · अलाहाबादचा तह :- बक्सारच्या
युद्धानंतर ऑगस्ट
1765 मध्ये लॉर्ड क्लाईव्हने अलाहाबाद येथे मोघल बादशहा शहाआलम सोबत तह केला.
या तहानुसार बंगाल प्रांतात दुहेरी राजकीय व्यवस्था सूरु झाली. |
2 |
|
वॉरेन हेस्टिंग्जजन्म : 1732 मृत्यु : 1818
कार्यकाल : 1772-1774 |
· सर वॉरन हेस्टिंगने बंगाल
प्रांतात न्यायविषयक सुधारणा केल्या व विल्यम जोन्सच्या सहकार्याने सन 1783 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या
संस्थेची स्थापना केली. · भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅझेट (1781) याच काळात सुरू झाले. · बंगालमध्ये
दुहेरी राज्यपद्धती थांबवली (जी रॉबर्ट क्लाईव्हने सुरू
केली होती.) · 1773 चा रेग्युलेटिंग
अॅक्ट |
गव्हर्नर जनरल (1773
-1833) |
|||
1 |
|
वॉरेन हेस्टिंग्जजन्म : 1732 मृत्यु : 1818
कार्यकाल : 1774-1785 |
·
जेम्स ऑगस्टस हिकीचे बंगाल गॅझेट पहिले भारतीय वृतपत्र प्रसिद्ध
(१७८०) ·
पहिले अँग्लो- मराठा युद्ध (1775-1782) (सूरत, पुरंदर, वडगाव,
साल्बाई असे तह झाले. ·
दुसरे अँग्लो – मैसूर युद्ध (1780 ते 1784) (मंगळूरचा तह ) ·
कलकत्ता येथे मदरसाची स्थापना (1781) ·
पिटस इंडिया अॅक्ट (1784) ·
फोर्ट विल्यम येथे सर्वोच्च न्यायालयची स्थापना झाली (१७७४) |
2 |
|
लॉर्ड चार्ल्स कॉर्नवॉलीसजन्म : 1738 मृत्यु : 1805 कार्यकाल : 1786-1793 |
·
लॉर्ड कॉर्नवॉलीसला भारतीय प्रशासकीय सेवेचा व कायमधारा पद्धतीचा
जनक असे सुद्धा म्हणतात. ·
कॉर्नवॉलिस कोडची सुरुवात (खटला चालविण्यासाठी
वकिलांची गरज असेल) ·
कनिष्ठ न्यायालय आणि अपील न्यायालयाची स्थापना केली ·
कायम धारा पद्धत बिहार आणि बंगाल प्रांतात सुरु केली. (इ.स.
१७९३) ·
तिसरे अँग्लो -म्हेसुर युद्ध (१७९० ते १७९३) ·
भारतामध्ये नागरी सेवेला सुरूवात. स्पर्धा परीक्षेची सुरुवात केली. ·
पोलिस विषयक सुधारणा घडवून आणल्या. भारतीय पोलिस व्यवस्थेचे जनक
म्हणतात. |
3 |
|
लॉर्ड रिचर्ड वेलस्लीजन्म : 1760 मृत्यु : 1842
कार्यकाल : 1798 – 1805 |
· सहाय्यक सैन्य पद्धतीचा (तैनाती
फौज) जनक म्हणतात. त्याने तैनाती फौजेच्या माघ्यमातून भारतात कंपनी सत्तेचा
विस्तार केला. · तैनाती फौजेच्या ही कल्पना
सर्वप्रथम सन 1899 मध्ये
निझामाने स्विकारली. · सन 1802 मध्ये दुसर्या
बाजीरावने वसईच्या तहातंर्गत तैनाती फौजेचा स्वीकार केला. · चौथे अंग्लो म्हैसूर युद्ध
(इ.स. १७९९) टिपूचा मृत्यु · दुसरे अंग्लो मराठा युद्ध
(१८०३–०५) · फोर्ट विल्यम कॉलेज कलकत्ता
येथे स्थापन. · मद्रास प्रेसिडेंन्सीची
स्थापना(निर्मिती) १८०१ |
4 |
|
लॉर्ड मिंटोजन्म : 1751 मृत्यु : 1814
कार्यकाल : 1807 ते 1813
|
·
महाराज रणजित सिंग सोबत १८०९ मध्ये अमृतसरचा तह केला ·
१८१३ चा चार्टर ॲक्ट |
5 |
|
लॉर्ड हेस्टिंग्जजन्म : 1754 मृत्यु : 1826
कार्यकाल : 1813 – 1823 |
·
अहस्तांतरणीय धोरण बंद केले ·
तिसरे अँग्लो - मराठा युद्ध (१८१६-१८१८) पेशवाई समाप्त. ·
१८१७ मध्ये कलकत्ता येथे हिंदू कॉलेज स्थापन (आताचे प्रेसिडेन्सी
विद्यापीठ) ·
मुंबई(बॉम्बे) प्रेसिडेंन्सीची निर्मिती (१८१८) ·
मद्रास प्रांतात रयतवारीला सुरूवात (1820) ·
महालवारी पद्धत मध्य भारत, पंजाब, आणि पश्चिम
उत्तर प्रदेशात सुरूवात |
6 |
|
लॉर्ड विल्यम बेंटिकजन्म : 1774 मृत्यु : 1839 कार्यकाल : 1828 -1833 |
·
सती बंदी कायदा बंगाल प्रांतात पास केला. (1829) ·
मुलकी व फौजदारी न्यायालयाची स्थापना (अलाहाबाद) |
भारताचे गव्हर्नर जनरल (1833-1858) तिसर्या चार्टर
अॅक्टनुसार (1833) बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर
जनरलचा दर्जा देण्यात आला. |
|||
1 |
|
लॉर्ड विल्यम बेंटिकजन्म : 1774 मृत्यु : 1839
कार्यकाल : 1833 - 1835 |
· भारताचे पहिले गव्हर्नर जनरल · चार्टर ॲक्ट, इ.स. १८३३ · इंग्रजी शिक्षण कायदा इ.स.
१८३५ ( भारतीयांच्या
शिक्षणाकरिता
इंग्रजी भाषा ही शिक्षणाचे माध्यम राहील असे जाहीर केले.) · कलकत्ता वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय |
2 |
|
लॉर्ड हेन्री हार्डिंगजन्म : 1785 मृत्यु : 1856
कार्यकाल : 1844 – 1848 |
· पहिले अँग्लो - शिख युद्ध
(१८४५–४६) · दुसरे ॲंग्लो - शिख युद्ध (१८४८–४९) · लाहोर करार समझोता (1846) · सरकारी कार्यालयाला रविवारची
सुट्टी सुरू केली. |
3 |
|
लॉर्ड डलहौसीजन्म : 1812 मृत्यु : 1860 कार्यकाल : 1848 -1856 |
· भारतातील आधुनिक सुधारणेचा जनक
असे म्हणतात. · 1848 -1849 दुसरे इंग्रज व शीख
युद्ध · मुंबई ठाणे पहिली रेल्वे
धावली (१८५३) · चार्लस वूडचा खलीता (१८५४) · भारतीय टपाल व तार खात्याची
स्थापना केली. (1854) · हिंदू विधवा पुनर्विवाह
कायदा इ.स. (१८५६) · सार्वजनिक बांधकाम विभाग
(१८५४) · दत्तक वारस नामंजूर कायदा
(खालसा धोरण) · पोस्टल तिकीटांची सुरुवात · भारताचे चलन रुपया म्हणून
सुरुवात. |
4 |
|
लॉर्ड व्हिस्काउंट कॅनिंगजन्म : 1812 मृत्यु : 1862
कार्यकाल : 1856 – 1858 |
·
विधवा पुनर्विवाह कायदा (1856) ·
भारतीय स्वातंत्र्य चळवळ उठाव ·
कलकत्ता (कोलकाता) , मुंबई, व
मद्रास(चेन्नई) येथे विद्यापीठे स्थापन. (1857) |
भारताचे व्हाईसरॉय (1858- 1947 ) |
|||
5 |
|
लॉर्ड व्हिस्काउंट कॅनिंगजन्म : 1812 मृत्यु : 1862
कार्यकाल : 1858 – 1862 |
· भारताचा पहिला व्हाईसरॉय
· भारत सरकारचा
कायदा(गवर्नमेंट ऑफ इंडिया ॲंक्ट), १८५८ (राणीचा जाहीरनामा) · इंडियन पिनल कोड लागू (1860) · भारतीय
पुरातत्व सर्वेक्षण स्थापना (१८६१) |
6 |
|
लॉर्ड मेयोजन्म : 1822 मृत्यु : 1872
कार्यकाल : 1869 – 1872 |
· स्टॅटिस्टिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना.
· भारतीय जनगणना
सुरू (१८72) |
7 |
|
लॉर्ड लिटनजन्म : 1831 मृत्यु : 1819
कार्यकाल : 1876 -1880 |
· पहिला दिल्ली दरबार भरवून राणी व्हिक्टोरियाला ‘भारताची सम्राज्ञी‘ किंवा ‘कैसर-ए-हिंद‘ हा किताब दिला.
(1877) · ‘व्हर्नाक्यूलर
प्रेस अॅक्ट‘ (देशी वृत्तपत्र कायदा) पास करून देशी वृत्तपत्रावर अनेक
बंधने लादली. (मार्च 1878) · भारतीय
शस्त्र कायदा (1878) · 1879 मध्ये लॉर्ड लिटनने
‘स्टॅट्युटरी सिव्हील अॅक्ट‘ पास
करून सनदी सेवेचे वय 21 वर्षावरून 18 वर्षावर आणले. · अलिगड मुस्लिम विद्यापीठास
प्रोत्साहन दिले. |
8 |
|
लॉर्ड रिपनजन्म : 1827 मृत्यु : 1909 कार्यकाल : 1880 – 1884 |
· इंग्लंडप्रमाणे भारतात ‘फॅक्टरी अॅक्ट‘ पास केला. (1881) · व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
रद्द केला (१८८२) लॉर्ड लिटनने केलेला
देशीवृत्तपत्रबंदी कायदा रद्द करून मुद्रण स्वातंत्र्य दिले. · सर विल्यम हंटर यांच्या
अध्यक्षतेखाली ‘हंटर शिक्षण आयोग’ नेमला. (1882) · लॉर्ड रिपनने 18 मे 1882 रोजी प्रत्येक प्रांतात स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करण्यासाठी एक
ठराव पास केला. त्यामुळे त्यास ‘स्थानिक
स्वराज्य संस्थेचा जनक‘ असे म्हटले जाते. · इल्बर्ट बिल पास (1833) |
9 |
|
लॉर्ड कर्झनजन्म : 1859 मृत्यु : 1925
कार्यकाल : 1899 -1904 व
1904 ते 1905 |
· सर
अॅन्ड्र्यू फ्रेझर अंतर्गत पोलिस आयोगाची नेमणूक · दुसरा दिल्ली दरबार भरविला.
(1903) · रेल्वे बोर्डाची स्थापना
(1903) · भारतीय विद्यापीठ कायदा पारित
केला. (1904) · प्राचीन स्मारक संरक्षण कायदा
(1904) · बंगालची फाळणी (1905) · लाल, बाल, पाल यांनी फाळणीच्या विरोधात दुसरे स्वदेशी आंदोलन केले. (1905 ते 1911) |
10 |
|
लॉर्ड मिंटोजन्म : 1845 मृत्यु : 1914
कार्यकाल : 1905 - 1910 |
· मुस्लिम लीगची स्थापना (1906) · १९०७ मध्ये काँग्रेसमध्ये फुट
(सूरत) · वृत्तपत्र अधिनियम (1908) · मोर्ले मिंटो सुधारणा (1909) |
11 |
|
लॉर्ड हार्डिंगजन्म : 1858 मृत्यु : 1944 कार्यकाल : 1910-1916 |
· तिसरा दिल्ली दरबार भरविला.
(1911) · राजा पंचम जॉर्ज व राणी मेरी
यांचा राज्याभिषेक · राजधानी कलकत्तावरून दिल्लीला
हलवली. · बंगालची फाळणी रद्द (1911) |
12 |
|
लॉर्ड चेम्सफोर्डजन्म : 1868 मृत्यु : 1933 कार्यकाल : 1916 – 1921 |
· इंडियन होमरूल लीग चळवळ (1916) · लखनौ करार (1916) ·
मॉन्टेंग्यु – चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
(1919) ·
भारत सरकार कायदा (1919) ·
रौलेट अॅक्ट (1919) ·
असहकार व खिलाफत चळवळ (1919) ·
जालियानवाला बाग हत्याकांड (13 एप्रिल 1919) |
13 |
|
लॉर्ड रीडिंगजन्म : 1860 मृत्यु : 1935 कार्यकाल : 1921 -1926 |
· असहकार
चळवळ (1921-1922) · चौरीचौरा घटना (1922) |
14 |
|
लॉर्ड आयर्विनजन्म : 1881 मृत्यु : 1959
कार्यकाल : 1926 – 1931 |
·
सायमन कमिशन (1928) ·
नेहरू अहवाल (1928) ·
लाला लजपत राय यांचा मृत्यु (1928) ·
लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराज्य घोषणा (1930) ·
मिठाचा सत्याग्रह (1930) ·
सविनय कायदेभंग चळवळ (1930) ·
प्रथम गोलमेज परिषद (1930-31) ·
गांधी – आयर्विन करार (1931) |
15 |
|
लॉर्ड वेलिंग्टनजन्म : 1866 मृत्यु : 1941
कार्यकाल : 1931– 1934 |
· दुसरी
गोलमेज परिषद (1931) · पुणे करार (1932) · कॉंग्रेस समाजवादी पक्ष स्थापन. जयप्रकाश नारायण व आचार्य नरेंद्र देव यांच्याकडून (1934) |
16 |
|
लॉर्ड लिनलिथगोजन्म : 1887 मृत्यु : 1952
कार्यकाल : 1934 -1937 व 1938 -1943 |
· भारत
सरकारचा कायदा (1935) · भारतीय
रिझर्व्ह बँकेची स्थापना (1935) · लाहोर
ठराव (1940) · क्रिप्स
मिशन (1942) · चलेजाव
चळवळीची घोषणा (1942) |
17 |
|
लॉर्ड माऊंटबॅटनजन्म : 1900 मृत्यु : 1979
कार्यकाल : 21 फेब्रूवारी 1947 ते 15 ऑगस्ट 1947 |
·
माऊंटबॅटन
योजनेची घोषणा (3 जून 1947)
(भारत व पाकिस्तान नवीन राष्ट्रांची निर्मिती केली जाईल) · भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यास संमती (18 जुलै 1947) · भारतास स्वातंत्र्य (15 ऑगस्ट 1947) · भारताचे शेवटचे व्हाईसरॉय . |
स्वातंत्र्योत्तर भारताचे
गव्हर्नर जनरल (1947-1950) |
|||
1 |
|
लॉर्ड माऊंटबॅटनजन्म : 1900 मृत्यु : 1979 कार्यकाल : 15 ऑगस्ट 1947
ते 21 जून 1948 |
·
भारताचे शेवटचे व्हाईसरॉय व स्वतंत्र भारताचे प्रथम गव्हर्नर जनरल |
2 |
|
चक्रवर्ती राजगोपालचारीजन्म : 1878 मृत्यु : 1972
कार्यकाल : 1948 -1950 |
·
स्वतंत्र भारताचे दुसरे गव्हर्नर जनरल ·
स्वतंत्र भारताचे पहिले तसेच
शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल |
|