- वामन पंडित
2. झाडे फळांच्या ओझ्याने खाली वाकतात. काळे ढग पाणी घेऊन (जमिनीच्या दिशेने) खाली वाकतात. थोर मनाचे लोक आपल्याजवळील संपत्तीचा गर्व करीत नाहीत. दुसèयावर उपकार करणाèया माणसांचा वैभवकाळ जवळ असताना नम्रपणे वागणे हा स्वभावच असतो.
3. तापलेल्या लोखंडावर पाण्याचा थेंब पडला असता तो शिल्लकही रहात नाही. (त्याचा लवलेशही राहत नाही) तोच पाण्याचा थेंब कमळाच्या पाकळीवर पडला असता सुंदर मोत्याप्रमाणे चमकतो. तोच पाण्याचा थेंब जर स्वाती नक्षत्रामध्ये समुद्रातील शिंपल्यात पडला तर त्याचा सुंदर मोती बनतो. यावरून संगतीने अनुक्रमे अधम, मध्यम व उत्तम अवस्था प्राप्त होतात.
4. काळानुसार द्रव्याचे खर्च होण्याचे पुढीलप्रमाणे मार्ग आहेत. दान करणे, उपभोग घेणे व द्रव्याचा नाश होणे. जो पैशाचा उपभोग घेत नाही, सत्पात्री दान करीत नाही त्याच्या पैशाला नाश होणे ही अवस्था प्राप्त होते.
5. या श्लोकात सांगितलेल्या बारा गोष्टी माणसाच्या हातातून नाहीशा झाल्यास जीवन वाया जाते म्हणून या गोष्टी वाया घालू नका. दुष्ट, स्वार्थी, लाचखाऊ मंत्र्यांच्यामुळे राजाचे जीवन नष्ट होते. प्रापंचिक माणसाच्या संगतीने संन्यासी माणसाचे जीवन नष्ट होते. मुलाचे खूप लाड केल्यामुळे तो बिघडतो. वेदांचा अभ्यास न केल्याने व आत्मसात केलेले ज्ञान इतरांना न दिल्यामुळे ब्राह्मण जात नष्ट होते. दुराचारी पुत्रामुळे कुळाचा नाश होतो. दुष्टांच्या संगतीने शील बिघडते. शेतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे (शेतीची नीट देखभाल न केल्यामुळे) शेती नष्ट होते. उन्मत्तपणाच्या वागण्याने लक्ष्मी निघून जाते. मद्यपानामुळे अब्रू (प्रतिष्ठा) नष्ट होते. लबाडीने वागल्यास मैत्री नष्ट होते. सतत प्रवासाला गेल्याने स्नेह नष्ट होतो. चुकीच्या मार्गाने पैसा खर्च केल्याने पैसा नष्ट होतो.
00000000000000000000000
भावार्थ
1. मगरीच्या दाढेत अडकलेला मणी आपण सामर्थ्यानिशी काढू शकतो, बाहुसामर्थ्याने महासागराच्या लाटातून आपण पैलतीराला जाऊ शकतो, मोठ्या सापाला आपण फुलाप्रमाणे मस्तकावर एक वेळ धारण करू शकू. परंतु आपण क्षणभरही मूर्ख माणसाच्या मनाची समजूत घालू शकत नाही. (म्हणजेच मूर्ख माणसाच्या मनाची समजूत घालणे कठीण आहे.)2. झाडे फळांच्या ओझ्याने खाली वाकतात. काळे ढग पाणी घेऊन (जमिनीच्या दिशेने) खाली वाकतात. थोर मनाचे लोक आपल्याजवळील संपत्तीचा गर्व करीत नाहीत. दुसèयावर उपकार करणाèया माणसांचा वैभवकाळ जवळ असताना नम्रपणे वागणे हा स्वभावच असतो.
3. तापलेल्या लोखंडावर पाण्याचा थेंब पडला असता तो शिल्लकही रहात नाही. (त्याचा लवलेशही राहत नाही) तोच पाण्याचा थेंब कमळाच्या पाकळीवर पडला असता सुंदर मोत्याप्रमाणे चमकतो. तोच पाण्याचा थेंब जर स्वाती नक्षत्रामध्ये समुद्रातील शिंपल्यात पडला तर त्याचा सुंदर मोती बनतो. यावरून संगतीने अनुक्रमे अधम, मध्यम व उत्तम अवस्था प्राप्त होतात.
4. काळानुसार द्रव्याचे खर्च होण्याचे पुढीलप्रमाणे मार्ग आहेत. दान करणे, उपभोग घेणे व द्रव्याचा नाश होणे. जो पैशाचा उपभोग घेत नाही, सत्पात्री दान करीत नाही त्याच्या पैशाला नाश होणे ही अवस्था प्राप्त होते.
5. या श्लोकात सांगितलेल्या बारा गोष्टी माणसाच्या हातातून नाहीशा झाल्यास जीवन वाया जाते म्हणून या गोष्टी वाया घालू नका. दुष्ट, स्वार्थी, लाचखाऊ मंत्र्यांच्यामुळे राजाचे जीवन नष्ट होते. प्रापंचिक माणसाच्या संगतीने संन्यासी माणसाचे जीवन नष्ट होते. मुलाचे खूप लाड केल्यामुळे तो बिघडतो. वेदांचा अभ्यास न केल्याने व आत्मसात केलेले ज्ञान इतरांना न दिल्यामुळे ब्राह्मण जात नष्ट होते. दुराचारी पुत्रामुळे कुळाचा नाश होतो. दुष्टांच्या संगतीने शील बिघडते. शेतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे (शेतीची नीट देखभाल न केल्यामुळे) शेती नष्ट होते. उन्मत्तपणाच्या वागण्याने लक्ष्मी निघून जाते. मद्यपानामुळे अब्रू (प्रतिष्ठा) नष्ट होते. लबाडीने वागल्यास मैत्री नष्ट होते. सतत प्रवासाला गेल्याने स्नेह नष्ट होतो. चुकीच्या मार्गाने पैसा खर्च केल्याने पैसा नष्ट होतो.
00000000000000000000000
No comments:
Post a Comment