Sunday, May 19, 2019

अखंड

- महात्मा जोतीराव फुले



सारांश : 

संतांनी ज्या प्रमाणे ‘अभंग’ ही काव्यरचना केली त्याप्रमाणेच महात्मा जोतीराव फुले यांनी स्वतःच्या काव्यरचनेला ‘अखंड’ हे नाव दिले आहे.  मानवी आचार - विचारामध्ये सत्य, ज्ञान, सद्विवेकबुद्धी व मानवता असणे हाच मानवाचा धर्म आहे. असे प्रतिपादन खालील ‘अखंडा’तून व्यक्त झाले आहे.
महात्मा जोतीराव फुले आपल्या अखंडात म्हणतात -
सत्याचा जिव्हाळा असला की मनाची स्वच्छता राहते. जेथे सत्य आहे त्या सत्यामुळे माणसाच्या चित्तास, मनास समाधान असते. Ÿ।।1।।
जेथे जागा मिळेल तेथे मानवाने सदा हृदयात धीर धरावा नेहमी सत्यवर्तन करण्यातच आपले आयुष्य खर्ची घालावे. Ÿ।।2।।
पीडा, दु:ख सहन करण्याची शक्ती आपल्यात असली पाहिजे तरच आपल्यावरील संकटांचे निवारण होऊ शकते. जगामध्ये गांजलेल्यांना आपण तारले पाहिजे. Ÿ।।3Ÿ।।
धीर धरून सर्वांना सुख दिले पाहिजे तेच लोक आयुष्यात यशवंत होतात असे महात्मा जोतीराव म्हणतात. Ÿ।।4।।
खरेपणाशिवाय दुसरा चांगला व स्पष्ट धर्म नाही. सत्य हाच खरा धर्म होय. सत्य नसेल तेथे मतभिन्नता निर्माण होते. मतभेद कधीही लोकांना रूचत नाही. मतभेदाचे लोकांना वावडे असते. Ÿ।।1।।
सत्याची कास कधी सोडू नये. सत्य सोडले की भांडण निर्माण होते. सत्य सोडले की जन्मभर बुद्धी भ्रष्ट होते. Ÿ।।2।।
(म्हणून) सत्य हाच धर्म कायम ठेवावा. सत्यामुळे माणसाला सर्व ठिकाणी सुखसमाधान मिळते. Ÿ।।3।।
सत्याने वागणे हा सदाचार आहे. सत्याचे आचरण करणे, मानवाचा धर्म आहे. महात्मा जोतीराव म्हणतात, सत्य सोडून बाकीचे वागणे, हा दुराचार आहे. Ÿ।।4।।
ज्याला लोभ झाला आहे त्या माणसाने सत्याने वागावे. तोच मनुष्य पदाला शोभून दिसेल तोच मानव सुखी होईल. Ÿ।।1।।
सर्वांनी सुखी व्हावे असे अशी आशा जो करीत असेल आणि आयुष्यात जो सद्गुणांची हाव करतो तोच खरा ज्ञानी होय. Ÿ।।2।।
दुसèयाचे सुखदु:ख जो जाणतो, त्याचे दु:ख आपले समजून त्यांच्याशी जो वागतो तो धन्य होय. ।।3।।
अशा मानवाला सद्गुणी म्हणावे. त्याला भावंड मानावे असे महात्मा जोतीराव म्हणतात.Ÿ।।4।।


No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024