Sunday, May 19, 2019

पाखरांनो तुम्ही

 रमेश तेंडुलकर




सारांश : 

विज्ञानाने मानवाची जशी एकामागून जशी प्रगती झाली तशीच दुसèया बाजुने त्याचे दुष्परिणामही मानवाला जाणवू लागते आहेत. विकासासाठी मानवाने अनेक कारखाने उभारले त्यामाध्यमातून त्याने प्रगती साधली परंतु दुसèया बाजूने या कारखान्यातून बाहेर पडणारा धुर हा प्रदूषणास कारणीभूत ठरत आहे. पर्यावरण प्रदूषणामुळे मानवाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याचा फटका निसर्गातील जीवजंतूना पाखरांनाही बसला आहे. आजचे विज्ञानयुग हे कविताला युद्ध्यमान जीवनसंघर्षाची अनुभूती देते. कवीला जे जाणवले ते या कवितेतून त्यांनी मांडले आहे.
त्या उद्वेगातूनच कवी म्हणतो, पांखरानो मनुष्याला जसे कारखान्याच्या सायरनची सवय झाली आहे तशीच तुम्हालाही आता सवय झाली असेल... या सायरनच्या बंधनात मनुष्य अडकला आहे. सकाळी सायरनच्या आवाजाबरोबर तो कामाला जुंपला जातो आणि त्याच्या आवाजानंतरच तो जेवणाला बसतो आणि त्याच्या आवाजानंतरच त्याची कामावरून सुटका होते. त्यामुळे त्या पाखरांनाही सायरनची सवय झाली असेल असे कवीला वाटत आहे. स्वच्छ, निळ्या आकाशात रोज सकाळी सायरनचे सूर पसरतात त्यावेळी तुम्ही कुठे असता? असा सवाल कवी पक्षांना करतो. तुम्ही जशी आकाशात उंच उंच भरारी घेत जाता तशीच सायरनच्या सुरांची उंच उंच कंपने हवेत चढत जातात... त्यावेळी तुम्ही कोठे जाता. हे सायरनचे आवाज म्हणजे तुम्हाला धोक्याचे इशारे आहेत. ते तुम्हाला समजतात काय ? नंतर ऑल क्लिअर म्हणजेच सारे काही आलबेल असल्याचेही दिलासे दिले जातात..
आम्हा मानवाचे जीवन तर सतत युद्धाच्या परिस्थितीत असल्यासारखे झाले आहे. त्याची आता आम्हाला सवय झाली आहे. सायरनच्या आवाजाबरोबरच आमचा जीवनसंघर्ष सुरु होतो. हे पाखरांने तुम्ही काय करता ? असा सवाल कवी करतो. आमचे जीवन घड्याळावर अवलंबून आहे. या सायरनच्या आवाजाबरोबरच आम्ही आमची घड्याळे लावूनच सारे कामकाज करीत असतो. घड्याळातील वेळेनुसारच कामाला जायला किती वेळ आहे याचा अंदाज घेतो. हे पाखरांनो आम्ही चाकोरीबद्ध जीवन जगत आहे परंतु तुम्ही कसे जीवन जगत आहात.......... असा प्रश्न उपस्थित करून कवी साèया प्रश्नांची उत्तरे वाचकांना शोधायला लावतो.

000000000000000000

No comments:

Post a Comment

दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024

  दहावीच्या परीक्षेत आलेले प्रश्न 2017 ते 2024