Monday, June 10, 2019

सनावळी


1453 ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल जिंकले.
1498 पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा कालिकतला आला.
1600 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची इंग्लंडमध्ये स्थापना.
1602 युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची नेदरलँडमध्ये स्थापना. (डच)
1619 सम्राट जहांगीरकडून ईस्ट इंडिया कंपनीला सूरत आणि हुगळीत  व्यापारासाठी परवानगी.
1639 मद्रास येथे इंग्रजांनी पहिली व्यापारी वखार स्थापन केली.
1664 फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची फ्रान्समध्ये स्थापना.
1737 इंग्रजांचे दक्षिण कन्नड प्रदेशाशी संबंध सुरू.
1742 फ्रेंच गव्हर्नर म्हणून डुप्लेची नेमणूक
1746-48          पहिले कर्नाटक युद्ध
1749-54          दुसरे कर्नाटक युद्ध
1756 बंगालमधील कृष्णरंध्र शोकांतिका.
1757 प्लासीची लढाई (रॉबर्ट क्लाईव्ह वि. सिराजउद्दौला)
1758-63         तिसरे कर्नाटक युद्ध
1760 पाँडेचेरीजवळ वाँदिवॉशची  लढाई (फ्रेंच वि. इंग्रज)
1761 नंजराजय्याला दूर सारून हैदर अलीने म्हैसूर ताब्यात घेतले.
1763 हैदर अलीने बिदनूरवर हल्ला करून मंगळूर ताब्यात घेतले.
1764 बक्सारची लढाई
1767 मराठे, हैद्राबादचा निजाम व इंग्रजांचे म्हैसूरवर आक्रमण.
1769 इंग्रजांशी लढत हैदर अली मद्रासपर्यंत पोहोचला.
1771 मराठ्यांनी म्हैसूरवर हल्ला केला.
1773 रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट
1776 अमेरिकेचे  स्वातंत्र्य युद्ध
1778 लॉर्ड लिटनने भारतीय वृत्तपत्रांवर ताबा ठेवण्यासाठी स्थानिक वृत्तपत्र अधिकार  कायदा केला
1780 मुंबईच्या सेनापतीने कुंदापूर ताब्यात घेतले.
1780 जेम्स ऑगस्ट हिकीने ‘दि बंगाल गॅझेट’ हे वर्तमानपत्र सुरू केले.
1781 सर आयरे कूटने हैदर अलीला पराभूत केले.
1782 जेम्स ऑगस्ट हिकी विरुद्ध मानहानीचा गुन्हा नोंदवून वॉरन हेस्टिंग्जने  त्याला कैदेत पाठविले.
1783 इंगजांशी झालेल्या लढाईत टिपूने होन्नावर गमावले.
1784 पिट्स इंडिया अ‍ॅक्ट
1789 फ्रेंच राज्यक्रांती
1790 तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध सुरू.
1792 श्रीरंगपट्टणचा तह.
1798 लॉर्ड वेलस्लीने म्हैसूरवर तैनाती फौज लादण्याचा प्रयत्न केला.
1799 श्रीरंगपट्टणला इंग्रज सैन्याने घेरले. टिपू सुलतानचा मृत्यू.
1811 पर्यंत राणी देवम्माने कोडगु सांभाळले.
1818 बंगाली भाषेत दिग्दर्शन हे मासिक आणि समाचार दर्पण हे साप्ताहिक सुरू
1820 कोडगुचा राजा लिंगराजचा मृत्यू. शेवटचा राजा चिक्कवीर सिंहासनावर  बसला.
1827 कलकत्ता येथे कामगार चळवळ सुरू झाली.
1836 स्वामी अपरांपर यांना अटक.
1836 बेळगाव... धारवाडपासून वेगळे करण्यात आले.
1837 कल्याणस्वामींना फाशी देण्यात आली.
1837 सुळ्याचे शेतकèयांचे सैन्य मंगळूरला पोहोचले.
1840 शेरामपूर (प.बंगाल) येथे हुगळी नदीच्या काठी पहिला कागद उद्योग  सुरू.
1853 चार्टर अ‍ॅक्टद्वारे सरकारी सेवेत भरती करण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षा सुरू करण्यात आल्या.
1853 मुंबई ते ठाणे दरम्यान भारतातील पहिली रेल्वे सुरू.
1854 मुंबईत भारतातील पहिला कापड कारखाना सुरू.
1857 भारतीय स्वातंत्र्याचे पहिले युद्ध
1857-58         नरगुंदचा उठाव
1858 व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा (भारताचा मॅग्ना चार्टा)
1858 ब्रिटिश सरकारकडून राणीचा सर्वाधिकार घोषित.
1860 बंगालमधील शेतकèयांच्या नीळ चळवळीला ईश्वरचंद्र विद्यासागरांच्या  सोमप्रकाश  वृत्तपत्राने                            पाठिंबा दिला.
1861 उत्तर कन्नडचा प्रदेश मुंबई प्रांतात समाविष्ट.
1861 इंडियन कौन्सिल अ‍ॅक्ट
1861 टाइम्स ऑफ इंडिया (मुंबई) वृत्तपत्र सुरू
1862 कुंदापूरच्या उत्तरेकडील प्रदेश मुंबई प्रांतात समाविष्ट.
1865 द पायोनियर (अलाहाबाद) वृत्तपत्र सुरू
1867 बळी (कलकत्ता-बंगाल) येथे मशिनवर पहिल्यांदा कागद तयार करण्यात  आला.
1870 कुल्ली (बंगाल) येथे बेंगाल आयर्न कंपनी लिमिटेडतर्फे पहिला पोलाद  कारखाना  स्थापन.
1872 भारतात पहिली जनगणती झाली.
1875 द मद्रास मेल (मद्रास) ) वृत्तपत्र सुरू
1875 द स्टेटसमन (कलकत्ता) वृत्तपत्र सुरू
1876 द सिव्हील आणि मिलिटरी गॅझेट (लाहोर)वृत्तपत्र सुरू
1885 अ‍ॅलन ऑक्टेव्हियन ह्यूमनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली.
1886 अ‍ॅल्युमिनियमचा शोध लागला.
1893 शिकागो सर्वधर्म संमेलनात स्वामी विवेकानंदांचे भाषण
1905 लॉर्ड कर्झनकडून बंगालची फाळणी त्याला जहालांचा विरोध.
1905 जपानने रशियाला हरविले.
1906 मोहम्मद अली जीनांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश.
1907 जमशेदपूर जवळ टाटा आयर्न अँड स्टील कंपनीतर्फे पोलाद कारखाना स्थापन
1909 मिंटो-मोर्ले सुधारणा अ‍ॅक्ट
1911 बंगालची फाळणी रद्द.
1911 सन एत सेन (क्योमिंग्टन पक्ष) नेतृत्वाखाली चीनच्या सम्राटाविरोधात  क्रांती
1911 अप्पिको चळवळ सुरू (सल्यानी जि. उत्तर कन्नड)
1914 जुलै          पहिले महायुद्ध सुरू (28 जुलै )
1914 जुलै         आस्ट्रियाचा युवराज आर्च ड्यूक फ्रान्झ फर्डिनँड याची हत्या झाली.
1916 भारतात होमरूल चळवळीचा प्रारंभ
1917 अ‍ॅनी बेझंट काँगे्रस अधिवेशनाच्या अध्यक्ष झाल्या.
1917 फेब्रु. रशियात राज्यक्रांती (फेब्रुवारी क्रांती) झाली.
1917 ऑक्टो. बोलशेविक्सच्या नेतृत्वाखाली रशियात क्रांती झाली.
1917 नोव्हें. रशियात समाजवादी क्रांती झाली.
1917 नोव्हें. लेनिनने रशियाला समाजसत्तावादी प्रजासत्ताक घोषित केले. (7 नोव्हेंबर)
1918 नोव्हें. पहिले महायुद्ध संपले (11 नोव्हेंबर)
1919 माँटेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा अ‍ॅक्ट
1919 रौलट अ‍ॅक्ट
1919           जनरल डायरकडून जालियानवाला बाग हत्याकांड (13 एप्रिल 1919)
1919          कायद्यानुसार भारतीयांना निवडणूक लढविण्याची संधी दिली गेली.
1919 मित्रराष्ट्रांच्या व्हर्सेलिन (व्हर्साय) तहावर सह्या.
1919 राष्ट्रसंघाची (लीग ऑफ नेशन्स) स्थापना.
1919 बर्नपूर (बंगाल) येथे दि इंडियन आयर्न अँड स्टील कंपनीतर्फे पोलाद  कारखाना स्थापन.
1920-47         गांधीयुग
1920 महात्मा गांधींकडून असहकार चळवळीचा प्रारंभ.
1922 चौरीचौरा  (उ.प्र) येथे जमावाने 22 पोलिसांना जिवंत जाळले.
1922 मोतीलाल नेहरू व सी.आर. दास यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली.
1922-43         मुसोलिनी हा इटलीचा पंतप्रधान होता.
1923 भद्रावती (कर्नाटक) येथे म्हैसूर आयर्न अँड स्टील कंपनी सुरू.
1924 म. गांधीजींची अनारोग्यामुळे कारावासातून मुक्तता.
1924 कलकत्ता नगरपालिका निवडणुकीत स्वराज्य पक्षाची सरशी.
1924 बेळगाव येथे महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे अधिवेशन.
1924 बेळगाव अधिवेशनात स्वराज्य पार्टीचा काँग्रेसमध्ये प्रवेश.
1924 रशियाच्या व्ही.आय. लेनिनचा मृत्यू.
1925 इटलीच्या मुसोलिनीने लोकशाही विसर्जित करून कायदेशीररित्या  हुकूमशाही अवलंबिली.
1925 चीनमध्ये साम्यवादी पक्षाचा उदय.
1926 ट्रेड युनियन अ‍ॅक्ट अंमलात आला.
1926 राष्ट्रकुल संघटना (कॉमनवेल्थ नेशन्स) स्थापन
1927 मे          जॉन सायमनच्या अध्यक्षतेखाली ‘सायमन कमिशनची’ स्थापना.
1929 लाहोर काँग्रेस अधिवेशन (अध्यक्ष : जवाहरलाल नेहरू)
1929 अमेरिकेतील आर्थिक विकास मंदावला.
1929 सोविएत रशियाने आर्थिक योजना सुरू केली
1930 रावी नदीच्या काठी जवाहरलाल नेहरूंनी भारतीय तिरंगा फडकविला.   (1 जानेवारी 1930)
1930 जाने. काँग्रेसकडून संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिन साजरा. (26 जानेवारी 1930)
1930 सविनय कायदेभंग चळवळ
1930 दांडी यात्रा (साबरमती ते दांडीपर्यंत)
1930 सुभाष चंद्र बोस यांनी विदेशी भारतीयांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास सज्ज  केले.
1930 पहिली गोलमेज परिषद
1930 युरोप आणि अमेरिकेत आर्थिक मंदी.
1931 गांधी-आयर्विन करार
1931 दुसरी गोलमेज परिषद
1932 तिसरी गोलमेज परिषद
1934 जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस यांच्याकडून काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना.
1934 विश्वेश्वरय्यांच्या भारताला योजित अर्थव्यवस्था पुस्तकाचे प्रकाशन. 
1934 ऑक्टो. चीनमध्ये माओ त्से तुंगद्वारा दि लाँग मार्चचे आयोजन.
1935 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट
1935 भारतीय सरकार कायद्याची स्थापना
1935 हिटलरने न्युरेनबर्ग लॉज नावाचे स्वत:चे कायदे बनविले.
1935 ऑक्टो. लाँग मार्चची सांगता.
1937 निवडणुकीनंतर सरकारमध्ये समाविष्ट होण्यासाठी मुस्लीम लीगला बोलाविले नाही.
1937 निवडणुकीनंतर काँग्रेस-मुस्लीम लीग संमिश्र सरकार स्थापण्यात अयशस्वी.
1938 त्रिपुरा काँग्रेस अधिवेशनाचे सुभाषचंद्र बोस अध्यक्ष झाले.
1939 ऑग. रशियाने जर्मनीबरोबर युद्धबंदीचा करार केला. Ÿ(24 ऑगस्ट)
1939 दुसरे महायुद्ध सुरू
1939 सप्टें.         पोलंडच्या विरोधात दुसरे महायुद्ध सुरू. (1 सप्टेंबर)
1940 मुस्लीम लीगच्या लाहोर अधिवेशनात मोहम्मद अली जीनांकडून देशाच्या अखंडत्वाविरोधात                              घोषणा.
1941 हिटलरचा रशियावर हल्ला
1942 छोडो भारत (चले जाव) चळवळ (9 ऑगस्ट 1942 रोजी सुरू)
1942 ईसूर घटना (म्हैसूर संस्थानातील शिकारीपूरजवळ)
1942 स्टॅलीनग्राड युद्धात रशियाने जर्मनीच्या तुकड्यांचा पराभव केला.
1943 पूर्व युरोपमध्ये जर्मनीला पराभवांच्या मालिकेला सामोरे जावे लागले.
1945 मुसोलिनीचा खून करण्यात आला.
1945 हिटलरने आत्महत्या केली.
1945 अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर अणुबॉम्ब  टाकला.
1945 जपानचा दुसèया महायुद्धात पराभव.
1945 ऑ.          रशियाकडून मांचुरियाची सुटका (15 ऑगस्ट)
1945 अन्न आणि कृषिविषयक संघटना स्थापन.
1945 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना.
1945 ऑक्टो. संयुक्त राष्ट्रसंघटनेची स्थापना (24 ऑक्टोबर)
1945 नंतर अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र बनले.
1945 नंतर अमेरिका व कम्युनिस्ट रशिया अशा दोन गटात जग विभागले गेले.
1946 मार्च         लॉर्ड माऊंटबॅटन भारताचा व्हाईसरॉय बनला
1946 मुस्लीम लीगने स्वतंत्र राष्ट्र स्थापण्यासाठी प्रत्यक्ष कृतिदिन साजरा केला  (16 ऑगस्ट)
1946 पंडित नेहरूनी रेडिओवरून भारताच्या परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्ये स्पष्ट केली.
1946 संघटित राष्ट्रांची युद्धपातळीवरील शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना. (युनेस्को)
1946 संघटित राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय बालकाचा आपत्कालीन निधी (युनिसेफ)
1947 जुलै          भारतीय स्वातंत्र्याचा मसुदा पास होऊन त्याचे कायद्यात रूपांतर झाले.
1947 जून          लॉर्ड माऊंटबॅटनच्या आदेशानुसार भारत-पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्रे उदयाला  आली (3 जून)
1947-48          भारत व पाकिस्तान यांच्यात युद्ध.
1947 भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे अस्तित्वात आली (15 ऑगस्ट)
1947 भारतात तात्पुरते सरकार स्थापन (15 ऑगस्ट)
1947 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यास प्रारंभ.
1947 आय.बी.आर.डी. (पुनर्बांधणी आणि विकास बँक)
1948 जाने. महात्मा गांधीजींची नथुराम गोडसेकडून हत्या (30 जानेवारी)
1948 हैद्राबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन.
1948 डिसें. संयुक्त राष्ट्रसंघटनेकडून मानवी हक्कांची घोषणा. (10 डिसेंबर)
1948 जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना.
1949 जाने. संयुक्त राष्ट्रसंघाकडून युद्धबंदीचा आदेश जारी.
1949 जुनागढ संस्थान भारतात विलीन.
1949 ऑक्टो. लोकमुक्ती सैन्याने पेकिंग (बीजिंग) शहरात प्रवेश केला. (1 ऑक्टोबर)
1949 दिल्लीत आशियायी संमेलन झाले
1949 चीनमध्ये कम्युनिस्ट राजवटीला सुरुवात.
1950 जाने. भारताची स्वतंत्र घटना अंमलात आली (26 जानेवारी)
1950 राष्ट्रीय योजना मंडळाची नेमणूक
1951 भारतात पहिली पंचवार्षिक योजना सुरू 
1952 भाषावार प्रांतरचनेसाठी पोट्टी श्रीरामलूचे उपोषण व प्राणत्याग. (52  दिवसानंतर)
1952 राष्ट्रीय विकास मंडळाची स्थापना
1953 आंध्र प्रदेश हे भाषावार प्रांतरचनेतील पहिले राज्य उदयास आले.
1953 फाजल अली आयोगाची रचना. (भाषावार प्रांतरचनेसाठी)
1954 पाँडिचेरी, माहे, करैकल, चंद्रनगर ही संस्थाने भारतात विलीन.
1954 भारत व चीन यांच्यात पंचशील करार झाला. (29 एप्रिल 1954)
1955 पोर्तुगीजाविरुद्ध गोवा मुक्ती आंदोलन सुरू
1955 बांडुंग येथेे आशियायी संमेलन झाले
1955 अस्पृश्यता विरोधी कायदा जारी
1955 दि एअर पोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना.
1956 राज्य पुनर्रचना कायदा संसदेकडून संमत.
1956 नोव्हें. म्हैसूर राज्याचे राष्ट्रपती बाबू राजेंद्र प्रसाद यांनी उद्घाटन केले. (1 नोव्हेंबर)
1956    सुवेझ कालवा प्रकरणी कोंडी.
1956 भाषावार प्रांतरचना करण्यात आली.
1957 युनिसेफचे स्थान निश्चित.
1958 लीप फॉरवर्ड पॉलिसी चीनमध्ये राबविण्यात आली.
1960 जागतिक हरित क्रांती. (डॉ. नॉर्मन बोरलाग)
1960 भौगोलिक माहिती व्यवस्थेचा (जीआयएस) कॅनडामध्ये प्रारंभ
1961 गोवा स्वतंत्र झाला.
1961 बर्लिनमध्ये आणीबाणीचा प्रसंग.
1961 हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला.
1962 क्युबाचा पेचप्रसंग
1962 चीनचे भारतावर आक्रमण
1963 पाँडिचेरीला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केले.
1963 अमेरिका व रशिया यांच्यात अनेक द्विपक्षीय करार.
1963 आफ्रिकन एकीकरणांची संघटना स्थापन. (ओ.ए.यू.)
1964 पंडित नेहरूंचे निधन
1965 भारत-पाकिस्तान युद्ध
1965 भारत व पाकिस्तान यांच्यात युद्ध
1965 युनिसेफला नोबेल पारितोषिक मिळाले.
1966 चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीची चळवळ सुरू.
1966 भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार.
1967 दक्षिणपूर्व आशियायी देशांची संघटना  (एसियन)
1967-70         भारतात हरित क्रांती  (डॉ. एम.एस. स्वामीनाथन)
1971 भारत-पाकिस्तान युद्ध
1971 भारत व पाकिस्तान यांच्यात युद्ध
1971 स्वतंत्र बांग्ला देशाची निर्मिती
1971 भारत व रशिया यांच्यात 20 वर्षाचा शांती, मैत्री व सहकार्याचा करार.
1973 चिपको चळवळ सुरू (तेहरी गढवाल, उत्तर प्रदेश)
1976 मूलभूत हक्क संरक्षण कायदा अस्तित्वात आला.
1976 समान वेतन कायदा लागू
1976 बॉम्बे हाय येथे तेल शोधून काढले.
1976 तेल व्यापारी उत्पादनाला सुरुवात.
1978 जिल्हा उद्योग केंद्र (डिस्ट्रीक्ट इंडस्ट्रिज सेंटर्स) स्थापना.
1978 बायोकॉन लिमिटेड ही जैविक तंत्रज्ञान संस्था सुरू
1979 चीनमध्ये डेंग शिओपिंग सत्तेवर आला.
1980 भारतात जैविक तंत्रज्ञान विकासासाठी संस्थेची स्थापना.
1985     रशियात ग्लॉसनॉस्ट (मोकळेपणा) तत्त्वाचा गॉर्बाचेव्ह यांच्याकडून वापर.
1985 दक्षिण आशियायी देशांची प्रादेशिक सहकार संघटना(सार्क) स्थापन.  (8 डिसेंबर)
1985 डिसें. दक्षिणपूर्व आशियायी  (सार्क) स्थापन (8 डिसेंबर)
1986 कर्नाटक लोकायुक्त अधिनियम लागू करण्यात आला.
1986 सार्कचे संमेलन बेंगळूर (कर्नाटक) मध्ये झाले. 
1986 हुंडा प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करून कायदा कडक करण्यात आला.
1986 बालमजूर प्रतिबंधक व नियंत्रण कायदा लागू
1987 केंद्रशासित प्रदेश असलेल्या गोव्याला राज्याचा दर्जा मिळाला.
1987 रशियात पेरेस्त्रोईका (पुनर्रचना) तत्त्वाचा गॉर्बाचेव्ह यांच्याकडून वापर.
1987 बालमजूर पुनर्वसन व कल्याण निधी स्थापन.
1988 राष्ट्रीय शिक्षण अभियान (नॅशनल लिटरसी मिशन)
1988 राष्ट्रीय बाल मजूर योजना अमलात आली.
1989 रशियातील कम्युनिस्ट राजवट ढासळली.
1989 अस्पृश्यता निर्मूलनाची जबाबदारी राज्यांना देण्यात आली.
1989 राष्ट्रीय राजमार्ग महामंडळाची स्थापना.
1990 भारत सरकारने उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग अधिकृतरित्या सुरू केला.
1990 मानवी विकास सूचीची निर्मिती.
1991 भारतात सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कची स्थापना.
1991 भारतात आर्थिक सुधारणांचा प्रारंभ (विदेशी थेट (सरळ) गुंतवणुकीला प्रारंभ).
1991 भारतात मुक्त हवाई धोरण सुरू. (ओपन स्काय पॉलिसी)
1992 युरोपियन समुदायाची स्थापना 
1993 भारतात पंचायत राज संस्था अस्तित्वात आली. (73 व्या कलमानुसार)
1994  प्रसूतीपूर्व गर्भ लिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायदा जारी.
1995 जागतिक व्यापार संघटना (1 जानेवारी) स्थापन.
1995 जागतिक व्यापार संस्था स्थापन. (1 जानेवारी) 
1999 भारत व पाकिस्तान यांच्यात युद्ध (कारगील युद्ध)
1999 सोनेरी चौपदरी योजनेचा प्रारंभ.
1999 इन्फोसिस टेक्नॉलॉजी लिमिटेडची स्थापना.
2001 सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात.
2001 अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला.
2001 एकता कपूरला यशस्वी उद्योजिका म्हणून एर्नेस्ट यंग संस्थेकडून गौरविण्यात  आले.
2004 आंतरराष्ट्रीय तहानुसार वादळांना नावे देण्यात येऊ लागली. 
2006 बालमजुरी निर्मूलन आणि पुनर्वसन कायदा जारी.
2007 बॅन की मून (द.कोरिया) युनोचे सचिव झाले. 
2009 घटनेच्या कलम 21 नुसार शिक्षणाचा हक्क (आर.टी.ई) देण्यात आला.
2011 जनगणतीनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटी झाली.
2011 शिरगणतीनुसार पुरुष साक्षरता प्रमाण 82.14 टक्के.
2011 शिरगणतीनुसार महिला साक्षरता प्रमाण 65.46 टक्के.
2015 संयुक्त राष्ट्रसंघाची मिलेनियम घोषणा (सक्तीचे प्राथमिक शिक्षक आणि  लिंग समानता)

Saturday, June 1, 2019

जग बदल घालुनी घाव

कवी : शाहीर अण्णाभाऊ साठे 

शाहीर अण्णाभाऊ साठे



यु ट्युब वर हा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा ...

                                     

Friday, May 24, 2019

चोळ आणि द्वारसमुद्राचे होयसळ


                                   (चोळ घराण्याचा कालावधी इ.स. 850 ते इ.स.1279)
                                      (द्वारसमुद्राचे होयसळांचा कालावधी इ.स. 984 ते इ.स.1346) 



Image result for brihadeshwara temple tanjore
बृहदेश्वर मंदिर, तंजावर 

 



Image result for chennakeshava temple belur
चन्नकेशव मंदिर, बेलूर  

     Image result for chennakeshava temple belur
            चन्नकेशव मंदिर, बेलूर 

शिलाबालिका   

प्रश्न 1 - रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

1. चोळांची राजधानी तंजावर ही होती.
2. प्रत्येक खेड्यातील ग्रामसभेला  महासभा अथवा पेरंगुरी असे म्हटले जात असे.
3. चोळांच्या काळातील अग्रहार असलेले प्रसिद्ध शैक्षणिक केंद्र उत्तर मेरूर
4. बेंगळूरजवळील बेगूर येथे चोळांनी चोळेश्वर हे मंदिर बांधविले.
5. होयसळ राजाच्या अंगरक्षक दलाला गरूड म्हटले जायचे.

6. राघवंकाने हरिश्चंद्रकाव्य ही कविता लिहिली.

प्रश्न 2 - थोडक्यात उत्तरे द्या.

1. चोळ साम्राज्याचा संस्थापक कोण ?
उत्तर : करीकळ हा चोळ साम्राज्याचा संस्थापक होय.
2. चोळ राज्यकारभाराची महत्त्वाची वैशिष्ट्ये कोणती
उत्तर : चोळांनी समर्थ आणि योग्य राज्यकारभार केला. मंडळ, कोटवंगी, नाडू, कुर्रम किंवा ग्रामसमुदाय आणि तरकुर्रम असे साम्राज्याचे वेगवेगळे भाग पाडले होते. प्रत्येक गावात उर नावाची लोकांची समिती असे.
खेड्यांचा स्वतंत्र कारभार हे राज्यव्यवस्थेचे वैशिष्ट्य होते. ग्रामसभा या प्रथम सभा असत. तरकुर्रम म्हणजे खेडे. प्रत्येक कुर्रमला ग्रामसभा असे. त्याला महासभा म्हटले जात असे. याला पेरंगुरी असेही म्हटले जात असे. त्यातील सभासदांना पेरुमक्कल म्हणत. सभासदांची निवड निवडणूक प्रक्रियेतून होत असे. संस्कृत विद्वान आणि श्रीमंतानाच फक्त निवडणुकांना उभे राहण्याचा अधिकार असे.
उत्पन्नाच्या 1/6 महसूल गोळ केला जात असे. पाणी पुरवठा पद्धतीवर विशेष लक्ष दिले जात असे. साहित्य, कला, संस्कृती, शिक्षणाला उत्तेजन दिले.
3. होयसळांनी साहित्याला कसे प्रोत्साहन दिले त्याचे वर्णन करा.
उत्तर : या काळात कन्नड साहित्याची भरभराट झाली. रुद्रभटाने जगन्नाथ विजय लिहिले. जन्न कवीने यशोधरा चरित्र लिहिले. हरिहराने चंपू कविता गिरिजा कल्याण लिहिली. राघवंकाने हरिश्चंद्रकाव्य, केशिराजने शब्दमणी दर्पण लिहिले. संस्कृतमध्ये देखील अविस्मरणीय साहित्यकृती निर्माण झाल्या. रामानुजाचार्यांचे श्रीभाष्य व प्रसारभट्टाने लिहिलेला श्री गुण रत्नकोश ही महत्त्वाची उदाहरणे होत.

 अवांतर प्रश्न 

1. चोळांच्या काळातील साहित्यकृती कोणत्या ?
उत्तर : चोळांच्या कालावधीत कंबाने रामायण लिहिले. सिक्कीलरने पेरीयपुराण, तर तिरुक्कदेवाने जीविका चिंतामणी रचले.
Related image
होयसळांची सिंहमुद्रा 
2. होयसळांच्या मंदिराबद्दल थोडक्यात लिहा.
उत्तर : होयसळांनी मृदू दगडात असंख्य मंदिरांची निर्मिती केली. त्यांच्या देवळात दिसून येणारी पाच वैशिष्ट्ये म्हणजे 1.नक्षत्राकृती सभागृह 2.उपपीठे 3.सुशोभित भिंती 4.कळस 5.खांब. अनेक सुंदर नर्तिकांचे पुतळे उभे केले आहेत. विष्णुवर्धनने चोळांवरील आपल्या विजयाच्या स्मरणार्थ तलकाडू येथे कीर्तीनारंग मंदिर आणि बेलूर येथे चन्नकेशव (विजयनारायण) ही मंदिरे बांधली. केटमल्ल सैन्याधिकारीने हळेयबीडू येथील होयसळेश्वर मंदिर बांधले. सोमदंड नायकाने सोमनाथपूर येथे केशवपूर मंदिर बांधले. अर्सिकेरी, गोविंदनहळ्ळी, दोड्डगड्डावळी आणि भद्रावती येथे अनेक मंदिरे आणि बस्ती बांधल्या. नाजूक कोरीव कामासाठी या कलाकृती प्रसिद्ध आहेत. दासोजा, चव्हाण, जकनाचार्य आणि डंकन हे त्या काळातील प्रमुख शिल्पकार होते.
3. विष्णुवर्धनने चोळांवरील आपल्या विजयाच्या स्मरणार्थ कोणती मंदिरे बांधली ?
उत्तर : विष्णुवर्धनने चोळांवरील आपल्या विजयाच्या स्मरणार्थ तलकाडू येथे कीर्तीनारंग मंदिर आणि बेलूर येथे चन्नकेशव (विजयनारायण) ही मंदिरे बांधली.
Image result for saint ramanujacharya
रामानुजाचार्य 

4. होयसळांच्या काळात कोणते धर्म अस्तित्वात होते ?
उत्तर : होयसळांच्या काळात जैन, बौद्ध, शैव, वैष्णव, वीरशैव, श्रीवैष्णव इ. धर्म अस्तित्वात होते.
5. होयसळांच्या काळात शैक्षणिक संस्था कोठे होत्या ?
उत्तर : मेलुकोटे, सालगाम, अर्सीकेरे आदी ठिकाणी उत्तम शैक्षणिक संस्था होत्या. अग्रहार, मठ आणि देवळे ही शैक्षणिक केंद्रे होती.

Related image
6. ‘गरुडविषयी माहिती द्या.
 उत्तर :  होयसळांच्या काळात राजाचे वेगळे सुरक्षा सैन्य (अंगरक्षक) सैन्य होते. त्याला गरुड म्हटले जात असे. या सैन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे जर राजाचा मृत्यू झाला तर यातील सैनिकदेखील बलिदान करीत असत. 








या संदर्भातील  व्हिडिओ  यू ट्यूबवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 






मान्यखेटचे राष्ट्रकूट आणि कल्याणचे चालुक्य


(राष्ट्रकूट घराण्याचा कालावधी इ.स. 753 ते इ.स. 973)
(कल्याणच्या चालुक्य घराण्याचा कालावधी इ.स. 973 ते इ.स. 1189) 

Image result for rashtrakuta map marathi
वेरूळ मधील कैलास मंदिर 


प्रश्न 1 - रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक दंतीदुर्ग होय.
2. राष्ट्रकूट राजाचा पराभव केलेल्या कल्याणचा चालुक्य घराण्यातील राजा दुसरा तैलप हा होय.
3. कवीरहस्याचा लेखक हलायुध.
4. पोन्नानी शांतीपुराण ही प्रसिद्ध कविता लिहिली.
5. कल्याणच्या चालुक्यामध्ये सहावा विक्रमादित्य हा सुप्रसिद्ध राजा होता.
6. या काळात सामाजिक सुधारणा करणारी व्यक्ती बसवेश्वर.

नाडोज पंप 

प्रश्न 2 - थोडक्यात उत्तरे लिहा.

1. राष्ट्रकूटांचा राज्यकारभार कसा होता ?
उत्तर : राष्ट्रकूटांच्या काळात राजपद हे वारसा हक्काने मिळत असे. मंत्रिमंडळ राजाला मदत करीत असे. मंत्रिमंडळात महत्त्वाच्या व्यक्तीची नेमणूक केली जात असे त्याला महासंधीविग्रह (परराष्ट्रमंत्री) म्हटले जात. तो विदेशी व्यवहार पहात असे. राज्यकारभाराच्या सुविधेसाठी साम्राज्याचे राष्ट्र, मंडळ, विशय, नाडू आणि ग्राम असे भाग पाडले जात असत. त्याचे प्रमुख त्याचा कारभार पहात. जमीन महसूल, जकात, घर, दुकाने आणि नावाड्यांचा कर हे राजाच्या उत्पन्नाचे साधन होते. परदेशी व्यापारातून कर मिळत असे.
2. राष्ट्रकूटांच्या काळातील शिक्षण पद्धती कशी होती ?
उत्तर : राष्ट्रकूटांच्या काळात अग्रहार आणि मठ ही शिक्षण केंद्रे होती. संस्कृत, वेद, खगोलशास्त्र, तर्कशास्त्र आणि पुराणांच्याबद्दल ज्ञान दिले जात होते. विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील सालोतगी हे प्रगत शैक्षणिक केंद्र होते.
3. वेरूळ येथील मंदिराबद्दल लिहा.
उत्तर : वेरूळ येथे अखंड दगडात कोरलेले देऊळ आहे. हे कैलाशनाथ मंदिर पहिल्या कृष्णाने बांधले. हे एका दगडात कोरलेले आश्चर्यआहे. हे मंदिर 100 फूट उंच 278 फूट लांब आणि 154 फूट रूंद खडकात कोरलेले आहे.
4. कल्याणच्या चालुक्यानी साहित्याला कसे उत्तेजन दिले ?
उत्तर : कल्याणच्या चालुक्यानी साहित्याला उत्तेजन दिले. या काळात जैन विद्वानांच्या सहाय्याने कन्नड साहित्याची भरभराट झाली. या काळातील प्रसिद्ध साहित्यकृती म्हणजे गदायुद्ध अथवा साहसभीम विजय (रण्ण), पंचतंत्र (दुर्गसिंह), विक्रमांकचरित्र (बिल्लण), धर्मामृत (नयनसेन), मिताक्षरी (विघ्नेश्वर), मानसोल्लास (तिसरा सोमेश्वर), संगीत चुडामणी (दुसरा जगदेकमल). याशिवाय त्या काळात वचन साहित्याची निर्मित झाली. अक्कमहादेवी, आलमप्रभू, माचय्या हे प्रमुख वचन साहित्यकार होते. 
----------------------------------------------------------------------------------------------
Image result for sant basaveshwar picture
संत बसवेश्वर 

Image result for kalyan chalukya coins
चालुक्यन काळांतील नाणी 
   












Image result for lakkundi kashivishweshwar devalaya
काशीविश्वेश्वर देवालय, लक्कुडी 

बदामीचे चालुक्य आणि कांचीचे पल्लव


(बदामीच्या चालुक्य घराण्याचा कालावधी इ.स. 540 ते इ.स. 753)
(कांचीच्या पल्लव घराण्याचा कालावधी (इ.स. 350 ते इ.स.895) 

Image result for pattadakal virupaksha temple
पट्टडकल विरुपाक्ष मंदिर 


प्रश्न 1 - रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.

1. पुलकेशीने राजा महेंद्रवर्मा या पल्लव राजाचा पराभव केला.
2. कर्नाटक हे नाव चालुक्य या घराण्याने दिले.
3. हर पार्वतीय हे संस्कृत नाटक शिवभट्टारकने लिहिले.
4. वातापिकोंड ही उपाधी पहिला नरसिंहवर्मा या पल्लव राजाला दिली गेली.
5. अर्जुनाची तपस्या ही कलाकृती महाबलीपूरम येथे आहे. 

Image result for mahabalipuram pancha rathas
महाबलीपुरम्मधील पंचरथ 

प्रश्न 2 - थोडक्यात उत्तरे द्या.

1. दुसऱ्या  पुलकेशीबद्दल माहिती लिहा.

Related image
पुलकेशी दुसरा 
 उत्तर : दुसरा पुलकेशी हा बदामीचे चालुक्य या घराण्यातील अत्यंत बलाढ्य व शूर सम्राट होय. गंग, कदंब व आलूप यांच्यावर वर्चस्व मिळवून आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. पल्लवांचा शूर राजा महेंद्रवर्माला पराभूत केले. उत्तरेतील हर्ष वर्धन राजाने नर्मदा ओलांडून दक्षिणेकडे येण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यालाही रोखले. या विजयामुळे त्याला दक्षिण पथेश्वरद्विपकल्पाचा सम्राटया उपाध्या मिळाल्या. आपल्या प्रचंड साम्राज्यावर राज्यकारभार ठेवण्यासाठी त्यांने आपल्या दोन भावांना वेंगी व गुजरातचा व्यवस्थापक नेमले होते.
ह्यू एन त्संगने पुलकेशीबद्दल लिहून ठेवले आहे की पुलकेशी राजा न्यायी आणि दयाळू होता. त्याचे सैन्य शिस्तबद्ध आणि निधड्या छातीचे होते. राजाचे प्रजेवर अत्यंत प्रेम होते. तो आशावादी सम्राट होता. त्याचे विदेशी राजांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. पर्शियन राजा दुसरा खुस्त्रोशी त्याचे राजकीय संबंध होते.
2. चालुक्यांच्या राज्यकारभाराचे वर्णन करा.
उत्तर : राजाचा राज्यकारभारात सक्रीय सहभाग असे. साम्राज्याचे जिल्ह्यात विभाजन केले होते. त्याला विशय म्हटले जात असे. त्याची देखरेख विशयाधिपती करीत असे. खेडे हा राज्यकारभाराचा सर्वात लहान घटक होता. ग्राम प्रमुख खेड्यांची व्यवस्था व हिशोब ठेवत असे. चालुक्यांनी धर्म, साहित्य, कला आणि शिल्पकलेचे संवर्धन आणि रक्षण केले.
3. चालुक्य हे साहित्यप्रेमी होते. विशद करा. उदा. द्या.
उत्तर : बदामीच्या चालुक्यांनी  साहित्याला उत्तेजन दिले होते. त्यामुळे कन्नड आणि संस्कृत भाषेची वाढ झाली. कन्नड ही राजभाषा होती. काव्यातील त्रिपदीशैली अस्तित्वात आली. कानडी साहित्यकृती निर्मिती नसली तरी शिलालेख मात्र उपलब्ध आहेत.
बदामीच्या कप्पे आर्यभटाची त्रिपदी शैली काव्यरूपात आढळून येते. रविकिर्ती विज्जीका, अकलंक हे या काळातील संस्कृत विद्वान होते. दुसèया पुलकेशीच्या सुनेने कौमुदी महोत्सव लिहिले. शिवभट्टारकाने हर पार्वतीयहे संस्कृत नाटक लिहिले.
4. कांचीवर राज्य केलेल्या पल्लव राजांची नावे लिहा.
उत्तर : शिवस्कंदवर्मा, महेंद्रवर्मा, पहिला नरसिंहवर्मा, दुसरा महेंद्रवर्मा, पहिला परमेश्वर वर्मा, आणि दुसरा नरसिंहवर्मा, दुसरा कीर्तीवर्मा व शेवटचा राजा अपराजित या राजांनी
5. पल्लवांनी संस्कृत आणि तामिळ भाषेला कसे उत्तेजन दिले ?
उत्तर : पल्लवांनी संस्कृत आणि तामिळ भाषेला उत्तेजन दिले. कांची हे संस्कृत साहित्याचे केंद्र होते. भारवी (किरातार्जुनीय) आणि दंडी (दशकुमार चरित्र) हे या काळातील कवी होते. राजा महेंद्रवर्माने मत्तविलास प्रहसनहे सामाजिक नाटक, ‘भागवद्ज्जुकग्रंथ लिहिला. भक्तीमार्गाच्या चळवळीतील संतांनी तामिळ भाषेमध्ये श्लोक लिहिले आहेत.

Related image

दक्षिण भारत - सातवाहन, कदंब व गंग


(इ.स.पू.3 ते इ.स.13 व्या शतकापर्यंत)
(सातवाहन घराण्याचा कालावधी इ.स.पू.230 ते इ.स.220)
( कदंब घराण्याचा कालावधी इ.स. 325 ते इ.स.540)
( गंग घराण्याचा कालावधी इ.स. 350 ते इ.स.1004)

Image result for gomateshwara bahubali
गोमटेश्वर बाहुबली 

प्रश्न 1 - खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

1. सिमूकाने श्रीकाकूलम ही आपली राजधानी केली.
2. हलाने गाथासप्तशती हा ग्रंथ लिहिला.
3. कानडी भाषेतील पहिला शिलालेख हाल्मीडी होय.
4. कदंबाची राजधानी ही आताच्या उत्तर कन्नड या जिल्ह्यात आहे.
5. गंग घराण्यातील दुर्विनीत हा मुख्य राजा होय.
6. चौंडरायने लिहिलेला ग्रंथ चौडपुराण.

प्रश्न 2 - थोडक्यात उत्तरे लिहा.

1. सातवाहन घराण्यातील शेवटचा राजा कोण ? सातवाहन घराण्याचा èहास कसा झाला ? 
उत्तर : यज्ञर्षी सातकर्णी हा सातवाहनांचा शेवटचा राजा होता. त्याच्या कालावधीत शकांनी सतत आक्रमण केल्यामुळे त्यांचे साम्राज्य खिळखिळे झाले आणि त्यांचा èहास झाला.
2. सातवाहन काळातील कलेबद्दल थोडक्यात लिहा.
उत्तर : सातवाहन राजांनी कला, साहित्य आणि शिक्षणाला उत्तेजन दिले. अजंठा आणि अमरावतीमधील चित्रकला सातवाहनांच्या काळात सुरू झाली. राजवाडे, देवळे विहार, चैत्यालय आणि किल्ले बांधले गेले. बनवासीचा व्यापारी भूतपालाने कार्ले येथे चैत्यगृह बांधले आहे.
3. गंगाच्या कारकीर्दीत कोणत्या सामाजिक मूल्यांना महत्त्व होते ?
उत्तर : प्रामाणिकपणा, एकनिष्ठता, शौर्य आणि संयम, धैर्य या सामाजिक मूल्यांना गंगाच्या कारकीर्दीत महत्त्व होते.
4. गंगाच्या कालावधीतील चार पुस्तकांची नावे लिहा.
उत्तर : गंगाच्या कालावधीत दुसरा माधवने दत्तकसूत्र लिहिले. दुर्विनिताने संस्कृतमध्ये शब्दावतार  ही रचना व गुणाढ्याच्या वोड्डकथांचे संस्कृतमध्ये भाषांतर केले. श्रीपुरुषाने गजशास्त्र लिहिले. शिवमाधवाने गजाष्टकची रचना केली. हेमसेनाने राघव पांडवीय, वादीबसिंहाने गद्यचिंतामणी आणि शास्त्रचुडामणी तर नेमचंद्राने द्रव्यसार संग्रह आणि चौंडरायाने चौडपुराण लिहिले.

Image result for karle chaityalaya
कार्लेतील चैत्यालय 
Image result for banvasi madhukeshwar temple
मधुकेश्वर मंदिर, बनवासी 

Image result for talakadu pataleshwar mandir
पाताळेश्वर मंदिर, तलकाडू 

भारताचे हवामान